ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा
मुसळधार पावसाचा इशारा; अनेक शहरांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, प्रशासनाचा मोठा निर्णय
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक भागांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला.
महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत ‘आदिशक्ती’ अभियानाचा शुभारंभ
५ जुलै २०२६ रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत 'आदिशक्ती महिला सक्षमीकरण' आणि 'टू व्हील्स ऑफ होप' उपक्रमांचा शुभारंभ झाला. यावेळी दोन हजार मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले, तसेच डिजिटल शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी सुविधा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पंढरपूर भेट
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाने उभारलेल्या नव्या धर्मशाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली.
नोकरीच्या शोधात असाल तर खुशखबर! पुणे-ठाणे मेट्रोत भरती; आकर्षक पगारासह अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Metro) ने पुणे आणि ठाणे मेट्रो प्रकल्पांसाठी विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून आकर्षक वेतनासह सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
एल निनोच्या आव्हानात शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची ग्वाही
मुंबईतील कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी शेतकरी, संशोधक आणि कृषी क्षेत्रातील योगदानकर्त्यांचा गौरव केला. एल निनोमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; कोचिंग संस्कृतीवर सरकारचा लगाम
राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे आणि कोचिंग क्लासेसमुळे महाविद्यालयांकडे होणारे दुर्लक्ष रोखणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.